Wednesday, March 3, 2021

वृक्ष, आपण आणि आपला स्वार्थ

     नमस्कार.   सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपणा सर्वांना सकाळी तोरण लावताना आंब्याच्या पानांची तसेच संध्याकाळी सोनं म्हणून शमी, आपट्याच्या पानांची आठवण आलीच असेल! आज सकाळी आमच्या सोसायटी मधील सर्व मुले एकाच आंब्याच्या झाडाखाली पाने जमा करण्यासाठी जमली होती तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, झाडांची आपण फक्त ठराविक वेळीच आठवण काढतो किंवा ज्या झाडांचा आपण फक्त स्वार्थासाठी च वापर करतो त्या झाडांचा आपण इतर वेळी कधी विचार का बरे करत नाही..? आंब्याची पाने भेटली नाही की ' आपल्या आजूबाजूला झाडेचं नाहीत ' एवढे बोलून आपण मोकळे होतो व हताश होतो. पण तीच झाडे लावण्याचा विचार आपल्या मनात का नाही येत? मुळात आपली संस्कृती ही फक्त निसर्गा मुळेच टिकून आहे तरी त्या निसर्गाचे रक्षण करण्याचा विचार का नाही येत आपल्या मनात? कोणी तरी सांगितले की आपले ' झाडे लावा झाडे जगवा ' वगेरे सुरू होतं त्यातही आमच्या कडे जागा नाही, वेळ नाही किंवा इतर काही कारणे देणारा वर्गही असतोच म्हणा. परंतु एखादी गोष्ट निश्चितपणे करायची असे ठरवल्यानंतर ती होतेच फक्त पाहिजे ती इच्छाशक्ती कारण ' इच्छा तिथे मार्ग '. मी काय म्हणतो या वेळी एक झाड लावून तर बघा. हा.. फक्त स्वतःचा विचार थोडासा बाजूला ठेऊन आपल्या भावी पिढी साठी का होईना. मी तर लावलं  बुआ! कारण ही पृथ्वी आपली माता आहे आणि ती तिच्या पुत्रांकडे मदतीसाठी हाथ पुढे करत आहे तिचे रक्षण करण्यासाठी. लक्षात ठेवा आपल्याकडे राहण्यायोग्य दुसरा ग्रह नाही आहे. 

                                                        - देशपांडे ऋग्वेद रविंद्र

                                                                     संभाजीनगर

No comments:

Post a Comment